---|| राजे ||---

Monday, October 25, 2010

---|| वढू - तुळापुर - संभू राजांच्या चरणी ||---



 पहाटे ६ वाजता शास्त्रीनगर - येरवडा येथून रवाना झालो ,
कोरेगाव-भीमा येथून डाव्या बाजूला काही अंतरावर वढू-बुद्रुक लागते.
पहाटे ६:४५ ला वढू-बुद्रुक मध्ये संभाजी राजांच्या समाधी स्थळी पोहचलो,
समोर संभू राजांची मूर्ती पहिली नी पावले तिकडे आपसूक वळली,
संभाजी राजांच्या भव्य - तेजोमय अश्या पुतळ्याचे दर्शन घेवून
आम्ही समाधी कडे वळलो .पहाटेची वेळ असल्याने तेथील संभू राजांची
पूजा करण्यासाठी "भोसेकर " नावाची व्यक्ती आली होती, येतील कोणी ना कोणी रोज संभाजी राजांची पूजा करतात.
आम्ही त्यांच्याशी ओळख करून घेतली, आणि आम्हाला
पूजा करण्याचा मान मिळाला . संभाजी राजांच्या समाधी स्थळी
पाणी वाहताना संभाजी राजांनी धर्मासाठी केलेले बलिदान आठवले ,
त्यांच्या समाधीस स्पर्श करताना अंग थरथरले, मन स्थब्द झाले.
काही वेळ तेथेच बसून राहिलो. काही वेळाने त्यांच्या भव्य
अश्या पुतळ्यास हार घालून त्यांचे  चरण स्पर्श केले .
त्यानंतर कवी कलस यांच्या समाधीचे दर्शन घेतले.
भोसेकर यांच्या कडून तेथील चाललेल्या कामाची माहिती मिळाली .
तटबंदीचे काम चालू होते, तसेच संभू राजांचे चरित्र शिल्प रुपात बनवण्याचे
काम चालू आहे, हे सर्व काम लोकवर्गणीतून चालू आहे , त्यामुळे अजून २ वर्षे
तरी काम पूर्ण होण्यास लागतील. संभाजी राजांच्या समाधीचे दर्शन घेवून
आम्ही ८ वाजता तुळापुर कडेरवाना झालो .  लोणीकंद मधून आतमध्ये
७-८ किलोमीटर वरती तुळापुर लागते, आम्ही तिथे पोहचलो. तिथे प्रवेश करताच
आम्हाला तिथे बनविलेली बाग दिसली आणि आतमध्येच उपहार गृह दिसले,
जे तिथे नको होते. तेथील संभू राजांची समाधीचे दर्शन घेतले, बगिच्यामुळे नी
उपहार गृहामुळे समाधी स्थळाचे वेगळेपण हरवले आहे.
तेथूनच त्रिवेणी संगम पाहायला मिळतो. तिथेच संगमेश्वरचे मंदिर आहे.
तेथे दर्शन घेवून आम्ही आमच्या परतीच्या वाटेकडे रवाना झालो.








Friday, October 1, 2010

---|| राजमाता जिजाऊ साहेबांना मनाचा मुजरा ||---

महाराष्ट्राच्या मातीत आणि या मातीतल्या माणसांच्या मनात आणि आचरणात ज्यानं स्वाभिमान आणि स्वातंत्र्य पेरलं, अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात ते स्वाभिमान आणि स्वातंत्र्याच बीज ज्या आईने पेरलं, ती आई म्हणजे जिजाऊसाहेब. त्यांना फक्त शिवबांच्याच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राच्या आई म्हणाव लागेल, म्हणूनच राष्ट्रमाता आणि राजमाता हे नाव जिजाऊ साहेबांना अगदी शोभते. काही शतकांनंतर सुद्धा छत्रपतींचे विचार किती सद्य परिस्थितीला साजेशे वाटतात. सामाजिक समता, मानवी हक्क, स्त्रियांचा हक्क, सर्वांसाठी समान न्याय आणि अनेक मानवी मुल्यांचा आदर करणारे विचार, जे छत्रपतींच्या आचरणात होते, आपण म्हणू शकतो या आईनेच त्यांना दिले; त्यासाठीचे वातावरण आणि संस्कार जिजाऊ साहेबांनी शिवरायांना दिले. हा सह्याद्रीचा राजा, सहयाद्री सारखाच कणखर आणि अंगाई सारखा दयाळू व मायाळू या आईच्या पदराखालीच झाला. पुढे छत्रपतींच बाळ, बाळराजे, धर्मवीर संभाजी महाराज ही याच कुशीत आणि संस्कारात वाढले.

याच आऊसाहेबांची साथ शहाजी राजांना होती, ज्यांनी स्वराज्याच स्वप्न जिजाऊ साहेबांसोबत पाहिलं; जिजाऊनी ते छत्रपतींकडून साकार करून घेतलं.[या वाक्यानं छत्रपती परप्रकाशित होत नाहीत; आणि तो उदेष्य ही नाही. कोणत्याही बाळाच्या यशात त्याच्या आईच्या संस्काराचा सिंहाचा वाटा असतो आणि राजे स्वयंप्रकाशित सूर्य होते, ज्याला सदैव तितक्याच तेजाच्या आईचे मार्गदर्शन लाभले]

स्वाभिमान आणि स्वातंत्र्याची साक्षात भवानी, एका सुर्याइतक्या तेजस्वी आणि सहयाद्री सारख्या कणखर आणि खंबीर असलेल्या युगपुरुषाची माता, धर्मवीर आणि ज्ञानवीर छत्रपती संभाजी राजांची आजी आणि आऊ असलेल्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांना मनाचा मुजरा आणि कोटी कोटी प्रणाम. 

संदर्भ  : http://rajmatajijau.blogspot.com/2010/02/blog-post.html
==========================================================================

---|| सेनापति सरनोबत हाम्बीररावांस पत्र ||---

"क्षत्रिय कुलवंतस श्री राजा शंभू छत्रपती प्रती

सरनोबत, सरलष्कर हंबीरराव मोहिते दंडवत उपरी,

मामासाहेब नात्याने आम्हीही आपले भाचे आहोत. भोसले आणि मोहिते घराण्याची सोयरिक् तर गेल्या तीन पिड्यांची .

आबासाहेबानी तुमच्या मस्तकावर सेनापतिपदाचा मन्दिल काय म्हणून ठेवला? सोयराबाई साहेबांचे बंधू म्हणून नव्हे ,

तर महाराजाना महाप्रतापी प्रतापराव गुजरांची जागा भरून काढायला एका रतनाची आवश्यकता होती .

आता थोरले महाराज गेले, आम्ही सारे पोरेके जाहालो ! योग्य तो निर्णय घेण्याइतके आपण सुद्न्य आहात मामासाहेब ---

उपरी आधिक काय लिहाव ? अंतर ना पडू द्यावे ही प्रार्थना "

============================================================================
 
"क्षत्रिय कुलवंतस श्री राजा शंभू छत्रपती प्रती राजश्री हंबीरराव मोहिते सरनोबत, सरलष्कर
तिर्थरुप आबासाहेबांचे महानिर्वाण जाहाले, आमच्या मस्तकावर अस्मानच फुटले. एशा कालकोपमधे एकच गोष्टा चांगली म्हणायची.
तीन मासामागे पन्हळगडि तिर्थरुप आबासाहेबानची दिर्घ भेट घडोनि आली. त्यांचे सहवासे सलग चार पाच रोज बहूत मसलति जाहल्या. मनातल्या आंदेशांचा आणि किन्तुपरंतु चा निचरा झाला. आम्हाकडून मोगलाईकडे निघून जाण्याचा आविवेकही आबासाहेबांनी पोटात घातला तिर्थरूपांचे काळीजच डोंगराएवढे. माफिही केली आणि मोगलांविरुध नव्या आघाडीची कामगिरीही त्यांनीसांगितली. तिर्थरूपांचे अवचित जाण्याची जखम खूप दांडगी . आठवाणे अजूनही डोळे गळतात. याउपरिही श्री कृपेकरून पुन्हा कंबर कसून खडे राहण्याचा आमचा मन्सुबा पक्का आहे. परंतु काही द्रष्ट कारभा-यांच्या आणि स्वार्थी मानत्यांच्या चाली तिरक्या आहेत. दिलामधे खोट. बालके राजारामांना गादीवर बसवण्याचा घातकि विचार ते मातोश्री सोयराबाईंच्या डोक्यात भरवतात. स्वार्थापोटी राजघराण्यात बखेडा करू बघतात. मामासाहेब राजारामाप्रमाणे आम्ही आपले सख्खे भाचे नसु, पण हिंदवी स्वराज्य निर्माण कर्त्या शिवाजीचे बाळ आहोत. त्या पापी औरंगजेबाचा एक दिवस काळ ठरू. आज राज्यापुढच्या वाटा निसरड्या. पल्ला दांडगा गाठायचा मन्सुबा आहेच. एशा वख्तास आपलाही हात द्याल तर संकटाचा दर्या सहज पार करू. हातून गलति घडल्यास आवश्य कान पिळायला आपुला अधिकार.
औरंगजेब पातशहा खूप माजला आहे. जिझीया कराचे हत्यार आपूल्या मस्तकी मारू चाहतो. राजश्री आबासाहेबांचे जे संकल्पित होते, ते चालवावे हेच आम्ही अगत्य जाणोन कारभार करितो, आशीर्वाद असु द्यावे, जाणिजे, लेखनाळंकार. .
संदर्भ :-
http://www.marathiadda.com/profiles/blogs/2437740:BlogPost:154199

Tuesday, September 28, 2010

---|| संभाजींच्या मातोश्री - सईबाई ||----

                                          सईबाई निंबाळकर (मृत्यू :- ५ सप्टेंबर १६५९.)

छत्रपती शिवरायांच्या पहिल्या पत्नी. धर्मवीर संभाजी राजांच्या मातोश्री.

जिजाऊ मातोश्रींची सर्वात प्रिय व संस्कार प्रिय सून .

सईबाई या छत्रपती संभाजी राजांच्या आई होत्या ,
परंतु संभू राजे लहान असतानाच सईबाईंचा मृत्यू झाला.

सईबाईंचे वडील माधोजीराव निंबाळकर होते.
छत्रपती शिवरायांबरोबर सईबाईंचा विवाह झाला
तेंव्हा त्या फक्त ७ वर्ष्याचा होत्या आणि शिवराय ११ वर्ष्यांचे होते.
त्यांच्या चेहऱ्याचा रंग गव्हाळ होता .
त्या शिवरायांच्या स्फूर्तीस्थान आणि सामर्थ्यवान अश्या पत्नीहोत्या.

त्यांच्या मृत्युनंतर शिवरायांना त्यांची भरपूर उणीव भासली .
संभू राजांना पाहताना शिवरायान पुढे सईबाईंची आभास मूर्ती उभी राहत असे .

मृत्यू समयी शिवरायांच्या तोंडून शेवटचा शब्द "सई" निघाला होता.
सईबाईंना संभाजींच्या अगोदर तीन मुली होत्या .

त्यातील एका कन्येचा (" सखुबाई") विवाह सईबाईंच्या भावाचा मुलगा बजाजी नाईक निंबाळकर यांच्याशी झाला .

संभाजींचा जन्म झाल्यानंतर त्यांची प्रकृती अधिकच खराब झाली होती, संभू राजे २ वर्ष्यांचे असतानाच आपल्या मातोश्रीनपासून दुरावले होते. पुढे संभू राजांना त्यांच्या आज्जी व शिरायांच्या मातोश्री " जिजाउंनी " घडवले.

---|| शिवजन्म ||---

सूर्यकीरणे गारव्याला होती जाळत
शिवनेरीवर भगवाही होता खेळत ,
येणार्‍या नव्या पर्वाची लागली होती चाहूल
शिवजन्मान पडणार होत पहिल मराठी पाउल ...


मराठ्यांचा प्रत्येक आश्रू
जिजाउन साठवला होता ,
आई भवानीस तेच आश्रू देऊन
पोटी मराठ्यांचा धनी मागितला होता ...


मंदिर थराराली , शिवनेरीची तोफ कडाडली
वार्‍याची कोवळी झुळुक दर्‍या खोर्‍यात दरवळली ,
जिजाउपोटी मराठ्यांचा राजा अवतरला
सांगत मुकी पाखरही किलबीलली ....


नगारा वाजला ,शाहिरी साज चढला
डंका डोंगरा आड सांगत सुटला ,
आता सह्याद्रीवर भगवा फडकनार
मराठ्यांची तलवार शत्रूवर धडकनार ....


इतिहासच पाहील पान
शिवजन्मान लिहाल गेल होत ,
हिरव्या दगडावर आता भगवे रक्त
स्वराज्याचा इतिहास कोरत होत!
- श्याम वाढेकर

---|| एक ज्वलंत व्यक्तिमत्व ||---

छत्रपति संभाजी, एक ज्वलंत व्यक्तिमत्व, शिवरायांचा छावा.थोरले छत्रपति, सईबाई
आणि जिजाउंच्या
काळजाचा तुकडा।
येसूबाई दुर्गाबाईंच्या
कपाळी चमकणारा
महातेजस्वी भास्कर, ज्याला आपल्या ओंजळित
घेताना मृत्यु
सुद्धा हळहळला
असेल, प्रत्यक्ष
यमधर्माचेही डोळे पाणावले असतील, आपल्या
देहदानाने महाराष्ट्राला जीवदान देणारा आणि
मरणोत्तर मराठी
माणसाच्या मनावर राज्य करणारा राजा,
*****संभाजी राजा*******

---|| हर हर महादेव ||---

होताच अवचित स्फोट, धुरांचे लोट,
भडकले चहुदिशेस पलिते
विषण्ण सुन्न आभाळ, धाडे तत्काळ,
मावळा, मेघांचे खलिते
यवनांनी साधला डाव, घातला घाव, आणिली वेळ समराची
हर हर महादेव गर्जना, गर्जु दे पुन्हा, रायगडा, रात्र वैर्‍यांची

सागराची गाज, दडपेन आज,
दर्पोक्ती बाळगे उरी
भ्याडांचा माज, शिखंडी बाज,
आलेच कसे या धरी ?
बोलविते ते धनी, आहे जे कुणी,
खात्रीने मुर्ख शंभरी
चाळलाच असता, इतिहास नुसता,
नसतेच चढले पायरी
महाराष्ट्र भुमी, ठेचतेच कृमी, आहे नोंद काळपर्वाची
हर हर महादेव गर्जना, गर्जु दे पुन्हा, रायगडा, रात्र वैर्‍यांची

गवताचे भाले, निमिषात झाले,
मरहट्टे रक्त सांडती
सह्याद्रीसाठी, हिमालयापाठी,
दख्खनही धावे मागुती
मुषक ते टिपले, बिळात लपले,
देऊन स्वंये आहुती
शहिदांच्या गजरा, मानाचा मुजरा,
नतमस्तक येथे धरती
पण आहेत अजूनी प्यादी, गैर अवलादी, दडलेली जात्यंधाची
हर हर महादेव गर्जना, गर्जु दे पुन्हा, रायगडा, रात्र वैर्‍यांची

बाघाच्या जबड्यात, घालूनी हात,
मोजतील कसे हे दात ?
कैसे जन्मा येती, वीर त्या प्रती,
या अशा षंढ पाकात
हिरवी पिलावळ, फक्त वळवळ,
ही एवढीच औकात
नेस्तनाबुत, करण्या हे भुत
पुरे एक आघात
जाहले बहूत इशारे, फुरफुरणारे, छाटावी जात गारद्यांची
हर हर महादेव गर्जना, गर्जु दे पुन्हा, रायगडा, रात्र वैर्‍यांची.

Topic Link
http://www.marathimehfil.com/?q=node/49

---|| संभाजी राजा - एक दंतकथा ||---

छत्रपती संभाजी राजांबद्दल एक कथा सांगितली जाते.
औरंगजेबाने अत्यंत क्रूरपणे संभाजीराजांची हत्या केली. मात्र तत्पूर्वी त्याने त्यांना, तू मुसलमान होतोस का, असं विचारलं होतं. त्यावर संभाजीराजांनी मोठ्या बाणेदारपणे त्याला उत्तर दिलं, ""तुझी जुलपुकार बेगम ही मुलगी मला देतोस, तर मी धर्मांतराला तयार होतो!''
ही जी कहाणी आहे ती मोठ्या अभिमानाने, संभाजीराजांची धर्मनिष्ठा अधोरेखीत करण्यासाठी सांगितली जाते. बखरकारांनी अगदी रंगवून रंगवून ही कथा सांगितली आहे. पण ही गोष्ट मुळातूनच खोटी आहे. कोणाही समकालिन लेखकाने या गोष्टीचा उल्लेख केलेला नाही. साकी मुस्तईद खानाने "मआसिरे आलमगिरी'त अथवा भीमसेन सक्‍सेनाने त्याच्या "तारीख-ए-दिलकुशा' या ग्रंथात अशा भाकडकथांचा उल्लेख केलेला नाही.
संभाजीचा जन्म 14 मे 1657चा. मृत्यु 11 मार्च 1689चा. मृत्युसमयी त्याचं वय 32 होतं. त्यावेळी औरंगजेबाच्या पाचांपैकी दोन मुली लग्नाच्या होत्या. त्यातील जेबुन्नीसा ही संभाजीपेक्षा 19 वर्षांनी मोठी होती आमि जिबतुन्नीसा ही 14 वर्षांनी मोठी होती.
सर्वात गमतीची गोष्ट म्हणजे औरंगजेबाला जुलपुकार नावाची मुलगीच नव्हती! मुळात हे नाव पुरूषाचं आहे!!
संदर्भ : http://khattamitha.blogspot.com/2008/02/blog-post_25.html

---|| थोडस महत्वाच ||---

*****कोणतीही गोष्ट करताना, त्यातील यश- अपयश , 
फायदा- तोटा  याचा विचार करू नका . 
कारण ती गोष्ट करताना तुमच्या मनाला,
मिळालेले समाधान महत्वाचे असते.*************

Tuesday, September 21, 2010

---|| वढू बुद्रुक आणि तुळापूर ||---

तुळापूर हे गाव भीमा, भामा आणि इंद्रायणी नद्यांच्या त्रिवेणी संगमावर वसले आहे. तुळापुर आळंदी पासून साधारण १४ किमी वर, तर पुण्यापासून अंदाजे ३० किमी वर आहे.
वढू बुद्रुक आणि तुळापूर भीमा नदीतीरावरची पवित्र स्थळे . या दोन गावांना ऐतिहासिक फार महत्व आहे. हीच ती भूमी जिथे संभाजी महाराजांवर अंतिम संस्कार झाले. औरंगजेबाने ज्या क्रुरतेने संभाजी महाराजांचा अंत केला आणि शरीराचे तुकडे अस्ताव्यस्त भीमेच्या किनारी टाकून दिले, त्या सर्व इतिहासाची साक्षीदार हि भूमी. नकळत इतिहासात घेऊन जाणारी हि भूमी

वढू बुद्रुक आणि तुळापूर या दोनही ठिकाणी संभाजी महाराजांची समाधी आहे. औरंगजेबाने जेव्हा संभाजी महाराजांच्या शरीराचे तुकडे इकडेतिकडे फेकून दिले त्या वेळी प्रत्येक मराठी माणूस हादरून गेला. संभाजी राजांचा अंतिम संस्कार रीतीने व्हायला पाहिजे आशेच सर्वाना वाटत होते. वढू च्या ग्रामस्थांनी यात पुढाकार घेतला. जीव धोक्यात घालून, भीमा ओलांडून आणि मुगली सैन्याला चकवून त्यांनी संभाजी महाराजांची मिळतील ती अंगे गोळा केली आणि विधिवत अंतिम संस्कार केला. असेच तुळापूरलाही घडले.

इतिहास आणि पर्यटन या दोहोंचा इथे सुरेख मिलाप झालाय ...... पराक्रमाने , शौर्याने पावन झालेली हि भूमी आहे. शिवपुत्र संभाजीची हि भूमी आहे.










संदर्भ : http://www.globalmarathi.com/GlobalMarathi/BlogDetails.aspx?BlogId=5421410614524659173&OId=5502788118444389516

Thursday, September 9, 2010

---|| थोडस महत्वाच ||---

** देवळात वेळ घालवण्या पेक्षा,
    काही तरी नवीन निर्माण करत राहा .
    देवाने तुम्हाला तुमच्या हातून काहीतरी,
    नवीन घडवण्यासाठी निर्माण केले आहे.
   आणि त्याच्याच मागे तुम्ही पळत राहिला तर,
   त्याच्या दृष्टीने तुमच्या जगण्याला काहीच अर्थ नाही.***

Monday, June 28, 2010

---|| वढू, तुळापुर ||---

---|| वढू, तुळापुर ||---
एक अस गाव, ज्याच नाव ही कानावर आल तर  "संभाजी राजाचं " चित्र डोळ्यांसमोर उभ राहत ,
त्यांनी धर्मासाठी सोसलेल्या कळा आठवल्यावर अंग शहारून येत . ज्यांनी अखेरपर्यंत हार मानली नाही,
मान झुकवली नाही , ज्यांचा आदर्ष्य डोळ्यापुढे ठेवून मराठी वीरांनी आदिलशाही , निजामशाही , इंग्रज भारत
भूमीतून हाकलून लावले.
अशा गावात आपलेच राजकारणी लोक कचरा डेपो सारखा प्रकल्प उभारून गावाचा ऐतिहासिक वारसा नष्ट  करण्याचा 
प्रयत्न करत आहेत. अश्या गावात शिवरायांची "शिवसृष्ठी  , संभाजींची "शंभूसृष्ठी " उभारणे आवश्यक आहे.

Tuesday, May 18, 2010

---|| जंजिरा किल्ल्यास भेट ||---


रविवारी १६ मे २०१० रोजी आम्ही जंजिरा किल्ल्यास भेट दिली. या किल्ल्याविषयी आमच्या मनात असणारे सर्व विचार तेथील सागरात वाहून गेले. ज्याचा आम्ही विचारही करू शकत नव्हतो , ते आमच्या पुढे घडत होते. आमची कार पार्किंग पासून सुरवात झाली, समुद्राच्या किनार्यावरती पार्किंग केल्यानंतर पार्किंगचे पैसे घेण्यासाठी मुसलमान माणूस होता. तेथून पुढे किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी बोटीतून जावे लागते त्यासाठी फक्त एकच ऑफिस तेही मुसलमानाचे , तिकीट २०/- प्रत्येकी. बोट चालवणारे त्यांचेच लोक. जेंव्हा बोटीतून किल्ल्याजवळ पोहचलो तेंव्हा त्यांनी फक्त ४५ मिनिटात बोटीजवळ येण्यास सांगितले, अन्यथा पुन्हा बोट मागवण्यासाठी ६००-८०० रुपये पडतील म्हणून सांगितले, आत गेल्यानंतर गायीड सुद्धा त्यांचाच त्याने प्रत्येकी ३०/- सांगितले, आणि इतिहास त्याच्या मनाप्रमाणे सांगितला, आम्ही त्याच्याबरोबर गेलो नाही, आम्ही फास्ट मध्ये किल्ला बघून घेतला , परंतु जे गायीड बरोबर होते त्यांना अर्धाच किल्ला दाखवून वेळ संपल्याचे सांगून बोटीवरती आणले गेले. बोटीमध्ये बसल्यानंतर बोटीत चढवण्यासाठी असणार्या लोकांनी त्यासाठी पैसे मागितले. आणि आम्ही गाडीजवळ पोहचलो. तिथे मुसलमानाचे अस्तित्व , किल्ल्यात असणारे त्यांचे दर्गे त्यामुळे किल्ला पाहण्याचा आमचा उस्ताह निघून गेला. तेतून काही अंतरावर शिवरायांनी बांधलेला "पद्मदुर्ग" पाहण्यास मिळाला, परंतु तिथे घेवून जाण्यास कोणीच तयार झाले नाही.

Thursday, April 15, 2010

---|| शंभुराजे साकारायचय ||---


शंभुराजे साकारायचय
आयुष्यात एकच स्वप्न शंभुराजे साकारायचय
तो शुर सिंहाचा छावा हातुन एकदा तरी आकारायचय
मरणाला न भिणारी कधी आमी मराठ्याची पोर
शाहिर सुद्धा सांगुन गेल ही होती सर्वांच्या म्होर
बघतोयस काय असा टकामका लवुन मुजरा कर
शुर संभाजी पुढे आहे बोला एकसुरात हरहर
हातात भगवा घेउन पुढे खंडोबाचा मळवट भाळी
एकदाची स्वारी निघाली ठोकुन त्वेषाने आरोळी
येतो आम्ही काळजी नसावी जिंकण्याची हौस डोळी
निघतो एकदाचा शुर तो चिखल काटे पायदळी
झुंजविले औरंगजेबालाही ज्याने म्रुत्यु त्याच्यापुढे फिका
कुशाग्र शक्तिशाली शंभु जिंकण्यास ना शत्रुस कधी मोका
समशेर हाती घेताच लोपत होत्या चंद्र तारका
असा हा सिंहाचा छावा मराठ्यांचा होता सखा
बलिदान जाईल वाया त्याचे केले जर दुर्लक्ष
रक्त सांडलय मराठयांसाठी नेहमीच होता दक्ष
पन घात केला काळाने डाव एकदाचा साधला
जगदंबा जगदंबा शेवटचे बोल मुखावाटे वदला
नेहमीच असायचा पुढे जरी होता तो राजा
मैदान सोडायचा नाही कधी उडविल्याशिवाय शत्रुचा फ़ज्जा
सात वर्षे नाही ठेवुन दिला कुणा मायभुमीत पाय
एकदातरी शंभुराजे साकारायचाय माघार घेणार नाय
_____
जितु

शिवाजी राजेंना vote करा

click and vote
http://www.whopopular.com/Chatrapati-Shivaji-#vitthalraje

Wednesday, April 7, 2010

--|| संभाजीराजांचे बलीदान ||--


संभाजीराजांचा जाज्वल्य धर्माभिमान !

संभाजीराजांच्या बलीदानाचा इतिहास लोकांना नीट माहीत नाही. १ फेब्रुवारी १६८९ या दिवशी सख्खा मेहुणा गणोजी शिर्के याच्या फितुरीमुळे संगमेश्वर या ठिकाणी संभाजीराजे काही वतनदारांची गाऱ्हाणी ऐकत असतांना पकडले गेले. त्या वेळी मोगलांनी लाखो सैनिकांच्या बंदोबस्तात राजांची धिंड काढली. त्यांना शारीरिक आणि मानसिक यातना दिल्या. विदूषकाचा पोषाख घालून, लाकडी सापळयात हातपाय अडकवण्यात आले. रक्‍तबंबाळ अवस्थेतील संभाजीराजांचे तत्कालीन चित्रकाराने रंगवलेले चित्र नगर येथील संग्रहालयात आजही आहे. असंख्य यातना सहन करणार्‍या या तेजस्वी हिंदु राजाची नजर अत्यंत क्रुद्ध आहे, असे त्या चित्रात दिसते. संभाजीराजांच्या स्वाभिमानाचा परिचय त्या क्रुद्ध नजरेवरूनच होतो. १५ फेब्रुवारी १६८९ या दिवशी औरंगजेबाबरोबर राजांची दृष्टीभेट पेडगावच्या किल्ल्यात झाली. `काफिरांचा राजा सापडला' म्हणून औरंगजेबाने नमाज पढून अल्लाचे आभार मानून अत्यानंद व्यक्‍त केला. त्या वेळी संभाजीराजांना औरंगजेबाचा वजीर इरवलासखान याने शरण येण्याचे आवाहन केले. संतप्‍त संभाजीराजांनी औरंगजेबाला मुजरा करण्यास नकार दिला. तो एकनिर्णायक क्षण होता. महाराजांनी वैयक्‍तिक सुखाच्या अभिलाषेपेक्षा हिंदुत्वाचा अभिमान महत्त्वाचा मानला. आपल्या वडिलांनी निर्माण केलेली स्वाभिमानाची महान परंपरा त्यांनी जपली. यानंतर दोन दिवसांत औरंगजेबाच्या अनेक सरदारांनी त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्‍न केला. त्यांना `मुसलमान झाल्यास जीवदान मिळेल', असे सांगण्यात आले; परंतु स्वाभिमानी संभाजीराजांनी या मुसलमान सरदारांचा सतत अपमान केला. शेवटी पापी औरंग्याने त्यांचे डोळे फोडले, जीभ छाटली तरीही राजांना मृत्यू स्पर्श करू शकला नाही. दुष्ट मोगल सरदारांनी त्यांना प्रचंड यातना दिल्या. त्यांच्या दिव्य धर्माभिमानाबद्दल त्यांना हे सारे भोगावेच लागले. १२ मार्च १६८९ या दिवशी गुढीपाडवा होता. हिंदूंच्या सणाच्या दिवशी त्यांचा अपमान करण्यासाठी ११ मार्चच्या फाल्गुन अमावस्येला संभाजीराजांची हत्या करण्यात आली. भाल्याला त्यांचे मस्तक टोचून मोगलांनी त्याची धिंड काढली. अशा प्रकारे १ फेब्रुवारी ते ११ मार्च असे ३९ दिवस यमयातना सहन करून संभाजीराजांनी हिंदुत्वाचे तेज वाढवले. धर्मासाठी बलीदान करणारा हा राजा इतिहासात अमर झाला. धर्मासाठी बलीदान करून इतिहासात अमर झालेले शंभूराजे. संभाजीराजांच्या या बलीदानामुळे संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला आणि पापी औरंग्याबरोबर मराठ्यांचा निर्णायक संघर्ष सुरू झाला. `गवताला भाले फुटले आणि घराघरांचे किल्ले झाले, घराघरातील माता-भगिनी आपल्या मर्दाला राजाच्या हत्येचा सूड घ्यायला सांगू लागल्या', असे त्या काळाचे सार्थ वर्णन आहे. संभाजी महाराजांच्या बलीदानामुळे मराठ्यांचा स्वाभिमान पुन्हा जागा झाला, ही तीनशे वर्षांपूर्वीच्या राष्ट्रजीवनातील अतिशय महत्त्वाची बाब ठरली. यामुळे इतिहासाला कलाटणी मिळाली. जनतेच्या पाठिंब्यामुळे मराठ्यांचे सैन्य वाढत गेले आणि सैन्याची संख्या दोन लाखांपर्यंत पोहोचली. जागोजागी मोगलांना प्रखर विरोध सुरू झाला आणि अखेर महाराष्ट्रातच २७ वर्षांच्या निष्फळ युद्धानंतर औरंगजेबाचा अंत झाला आणि मोगलांच्या सत्तेला उतरती कळा लागून हिंदूंच्या शक्‍तीशाली साम्राज्याचा उदय झाला. २७ वर्षे औरंगजेबाच्या पाशवी आक्रमणाविरुद्ध मराठ्यांनी केलेल्या संघर्षात हंबीरराव, संताजी, धनाजी असे अनेक युद्धनेते होते; परंतु या लढ्याला कलाटणी मिळाली ती संभाजीराजांच्या बलीदानातून झालेल्या जागृतीमुळेच.
शिवाजी आणि संभाजी हे आहेत महाराष्ट्र धर्माचे मूलमंत्र ।
जगावे कसे सांगे शिवचरित्र आणि मृत्यूचा आदर्श देई शंभूचरित्र ।।

---|| शम्भू राजे ||---

------------शम्भू राजे----------------
शिव रुपाने मराठ्यांचा सूर्य उगवला
पराक्रमे तयाच्या महाराष्ट्र दारी भगवा फडकला !!

बापाने घडवल्या मुलुखाला
पुढे रेटाया आज युवराज धड़कला |
सिंहाच्या छाव्या जन्मी घालुनी ,
सयीने पुरंधारी शम्भू जोडीला !!

माथी संकट नसे , तो कोण भोसला
सिद्ध करावया शम्भू लहणपणीच संकटाशी भिडला |
युवराज असुनही त्या दिवासी शम्भू एकाकी पडला
कळन्याअधिच आईचा पदर सरला !!

धाराऊ दुधाने बाळशम्बु सळसळला ,
शिवाचा फ़र्जन्दच तो , त्यांच्या तोलानेच तयाने भगवा हाती धरला |
एक समयी पाच मिहिमा लढला होता ,
मराठ्यांची ताकत धाखवत , शम्भूराजा अवघ्या मुलुखाची शान बनला होता !!

रायगडाच्या होळी माळावर उभ्या त्याच्या आबासाहेबाना मनात आठवत ,
मांवळचा हा वाघ लढत होता |
औरंग्याची गुर्मी उतरवत ,
शिवाचा शम्भू सारी हिरवी धगड़ फोडत होता !!!

गनोजी सिर्क्याच्या बैमान हातान , आप्त्स्वकियानिच त्याचा घाट रचला होता ,
पैस्यापाई त्याना हा स्वाभिमानी राजा नको होता |
सर्वाना पुरून उरनारा शम्भुराजा
म्हनुनच आज शत्रु हाती सापडला होता !!


डोळे फोडले , मीठ चोळले ,
तरी राजा डगमगत नव्हता |
कवडयाच्या माळीवर हात घालनार्यावर ,
त्याअवस्तेताही शम्भुराजा भडकला होता !!!

पण भवानीनेच आज गोंधळ घातला होता ,
म्हनुनच की काय तिला हा वीर स्वर्गातच पाहिजे होता |
शिवाने दिलेल्या शपतेपाई शम्भुराजा महाराष्ट्र धर्मासाठी बेचाळीस दिवस लढला
मरता मरताही भगवा कवटाळत ,
शम्भू राजाने " जग्दम्भ !! " म्हणत हिन्दवी शब्दच उच्चारला होता
हिन्दवी शब्दच उच्चारला होता ....... !!!!

Tuesday, February 16, 2010

---|| संभाजीराजे ||---|| तरुणपण ||---


१६७४ मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तोपर्यंत संभाजीराजे राजकारणातील बारकावे आणि रणांगणातील डावपेचांमध्ये तरबेज झाले होते.त्यांच्या विनम्र स्वभावाने राज्याभिषेकासाठी रायगडावर आलेल्या प्रतिनिधींना जिंकून घेतले.

शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर १२ दिवसात जिजाबाईंचे निधन झाले. त्यानंतर संभाजीराजांकडे मायेने लक्ष देणारे कोणी राहिले नाही. शिवाजी महाराज स्वराज्याच्या राजकारणात आणि रणांगणावर गुंतले होते. सळसळत्या रक्ताच्या तरुण संभाजीराजांचे शिवाजी महाराजांच्या दरबारातील अनुभवी मानकर्‍यांशी अनेकदा मतभेद होऊ लागले. महाराजांचे अमात्य संभाजीराजांचा अण्णाजी दत्तोंच्या भ्रष्ट कारभाराला सक्त विरोध होता. शिवाजी महाराजांनी अनेकदा अण्णाजी हे अनुभवी आणि कुशल प्रशासक असल्यामुळे त्यांच्या भ्रष्ट कारभाराकडे दुर्लक्ष केले. पण संभाजीराजांना ते मान्य करणे कठीण होते. एकदा भर दरबारात अण्णाजी येताच संभाजीराजांनी, 'आबासाहेब, हे बघा आपले लबाड अमात्य आले' असे उद्गार काढल्याचे इतिहासात नमूद केले आहे. या कारणांमुळे अण्णाजी दत्तो आणि इतर अनुभवी मानकरी संभाजीराजांच्या विरोधात गेले.

सोयराबाई आणि दरबारातील काही मानकरी संभाजीराजांना अपमानास्पद वागणूक देऊ लागले. त्यांच्या विरोधामुळे त्यांना शिवाजी महाराजांबरोबर दक्षिण हिन्दुस्थानच्या मोहिमेवर जाता आले नाही. तसेच शिवाजी महाराजांच्या अनुपस्थितीत संभाजीराजांचे हुकूम पाळण्यास अष्टप्रधानमंडळाने नकार दिला. त्यामुळे शिवाजी महाराजांना कोकणातील शृंगारपूरचे सुभेदार म्हणून संभाजीराजांना पाठवावे लागले. अफझलखान, शाहिस्तेखान यांच्यासारख्या बलाढय शत्रूंना खडे चारणारे युगपुरुष शिवाजी महाराज घरातील बेबनावापुढे दुर्दैवाने हतबल ठरले. आपल्याला दक्षिण हिन्दुस्थानच्या मोहिमेपासून जाणीवपूर्वक दूर ठेवले गेल्याचा सल संभाजीराजांच्या मनात कायम राहिला.

शृंगारपूरचे सुभेदार म्हणून संभाजीराजांनी दुष्काळग्रस्त प्रजेकडून एक वर्ष करवसुली न करायचा निर्णय घेतला. तेव्हा सोयराबाई आणि दरबारातील मानकर्‍यांनी संभाजीराजे हे बेजबाबदार प्रशासक आहेत आणि राज्याचे वारस म्हणून योग्य नाहीत असा प्रचार सुरू केला. सोयराबाईंची अपेक्षा होती की शिवाजी महाराज राज्याचे वारस म्हणून राजारामांचे नाव जाहीर करतील.

Wednesday, February 3, 2010

मनसोक्त जगून घ्यावं...

मनसोक्त जगून घ्यावं...

नाजुकशा कळीचं ते मोहक हास्य,
फुलणाऱ्या फुलाचं ते अबोल भाष्य,
डोळ्यात सारं साठवून मिटून घ्यावं,
जे आहे आज आहे, मनसोक्त जगून घ्यावं...

काळोखाच्या शालीवर तारकांची कोरीव नक्षी,
अनंत आकाशी भरारी घेती छोटे छोटे पक्षी,
छोट्याशा मनातील स्वप्नांना मग आशेचं बळ द्यावं,
जे आहे आज आहे, मनसोक्त जगून घ्यावं...

वाट बघणारा श्रीकॄष्ण घाली राधिकेला सुमधूर साद,
बासरीच्या सुराकडे खेचला जाई तिच्या पैंजणांचा नाद,
हळूवार या नादावर कधी आपलंही मन थिरकावं,
जे आहे आज आहे, मनसोक्त जगून घ्यावं...

सरला जरी ऋतू, जरी नसला कधी बहर,
येतील दिवस चैतन्याचे,घेऊन नव्या पालवीचा मोहर,
निसर्गाचं हे गुपित जरा आपणही जाणून घ्यावं,
जे आहे आज आहे, मनसोक्त जगून घ्यावं...

Tuesday, January 19, 2010

---|| आई ||---

असं लहान आम्ही अजून किती दिवस रहायचं...

असं लहान आम्ही अजून किती दिवस रहायचं...
आई सांगणा आम्हाला
असं लहान आम्ही अजून किती दिवस रहायचं...
शाळा चालू झाल्यावर पावसाळ्यात
पुस्तक भिजण्याचं कारण सांगून
एकुलती छत्री आम्हला देवून
तू भिजत भिजत शाळेपर्यंत सोबत यायचं
आम्ही नाही भिजलोत म्हणून
समाधान मानत तसंच
परत भिजत भिजत घराकडे जायचं
थंडीने गारठा भरूनही
पुन्हा कामाला लागायचं
आम्ही घरी येताच
आम्हाला जेवू घालायचंस
आणि काही शिल्लक नाही
म्हणून तू उपाशीच रहायचस
आई सांगणा हे अजून कुठवर चालायचं...
कोणाकडे पाहून आम्ही खेळणं मागताच
ते चांगलं नाही
आपण त्याहून चांगलं घेऊ
म्हणून आम्हाला समजवायचं
आणि नंतर आम्ही झोपी जाता
तू मूकपणे आसवं गाळायचं
दिवाळीला आम्हाला नवीन कपडे देवून
तू जुन्यातच समाधान मानायचं
माझ्या बाळांना सारं सुख मिळावं
हेच स्वप्नं नेहेमी उराशी जपायचं
संसाराचे चटके सोसून आम्हाला
नेहेमी मायेच्या उबेतच ठेवायचं
सांगणा आई हे अजून कुठवर चालायचं...
असं लहान आम्ही अजून किती दिवस रहायचं...
--पवन---

Wednesday, January 13, 2010

नमस्कार
आपले स्वागत आहे
येथे आपणास शंभू राजांविषयी विषयी माहिती मिळेल

================================================
------------------|| विठ्ठलराजे ||---------------------
--------"" होय आम्ही अजुन जिवंत आहोत ""--------
"आचार, विचारातुनी अजूनही जपतो आमचा मराठी बाणा,
अजूनही जिवंत आहेत अमुच्या पुर्वज्यांच्या पाउलखुणा."
=================================================